माझा बापू

Sunday, January 9, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०१.२०१२)
!! हरि ॐ !!


दोन हजार बारा नविन सहस्त्रक सुरू होतंय करता करता ११ वर्षे निघून गेली बारावं आलं. नव वर्षाचं स्वागत प्रत्येक जण करत आहे.


पहिला महिना जानेवारी हा इतका वेगळा असतो - नाताळाची सुट्टी संपलेली असते, फायनल exam थोड्या लांब असतात. पण दहावीसाठी जानेवारीच्या एक तारखेला पोटात खड्डा पडलेला असतो, फेब्रुवारीच्या एक तारखेला पोटात दरी पडते आणि मार्च महिन्यात काळजाचा ठोका चुकतो.

आमचं ही असचं असतं Happy Birthday करुन टाळ्या पिटून आपण ५० वा वाढदिवस साजरा करताना माणूस खूश नसतो, बाई तर अजिबात खूश नसते. आता साठी झाली एक वर्ष आणखी कमी झालं मनात कातरपणा येतो. जून ते जानेवारी आम्ही काहीही केलेलं नसतं म्हणून जानेवारी महिन्यात खड्डा पडतो, तसचं ५० पर्यंत काहीही केलेलं नसतं म्हणून खड्डा पडतो, साठाव्या वर्षी दरी पडते आणि पंच्याहत्तर नंतर काळजाचा ठोका चुकतो. हे का घडतं? कारण मनुष्य आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघत नाही.

स्टेशनवर उभे आहात आणि गाडी आली हे वाक्य ऐकलं की गाडीच्या दिशेने पळता. गाडी पकडण्यासाठी स्टेशनच्या गेटकडे पळत नाही. पण फुटपाथावर उभे असतांना हे वाक्य ऐकलं की गाडीच्या विरुद्ध दिशेने पळावं लागतं. शब्द तेच पण पळण्याची दिशा वेगळी कारण परिस्थिती वेगळी.
हे केव्हा घडतं जेव्हा वास्तवाचं भान असतं तेव्हा. आम्ही आमच्या कल्पनांत राहतो. कल्पनांचा उपयोग नवनिर्मितीसाठी योजना बनविण्यासाठी करायचा असतो मनोराज्यासाठी नाही.

स्टेशनवर असतांना गाडीच्या दिशेने धावावं लागतं आणि फुटपाथवर असतांना गाडीच्या विरुद्ध दिशेने धावावं लागतं. आपण कुठल्या दिशेने प्रवास करायचा, आपली प्रगती कुठल्या दिशेने आहे, आपल्याला संरक्षण आहे हे बघणं आवश्यक आहे.
हे केव्हा कळतं आपण जेव्हा आजूबाजूची परिस्थिती बघतो तेव्हा. पण आपली हवी असणारी गाडी सुटते आणि नको असणारी गाडी अंगावर येऊन धडकते.
साठच्या पुढचा प्रत्येक वाढदिवस ९९.९ टक्के माणसांना दु:खकारक असतो कारण त्याच्या मनाला भितीने ग्रासलेलं असतं. भूतकाळ राक्षस होऊन खायला उठतो आतापर्यंत काय केलं? आजपर्यंत जे करता आलं नाही ते ह्या थकलेल्या जर्जर अवस्थेत कसं जमणार आणि म्हणून प्रत्येक वाढदिवस त्याच्या मृत्युचं आणि अपयशाचं सेलिब्रेशन असतं.
हे असं होऊ नये म्हणून जानेवारी महिना उत्तम आहे. वर्ष सुरु होत असतानाच गेल्या वर्षात काय काय घडलं हे पहायचं. मी काय चूका केल्या ते बघा आणि इतरांनी काय चांगलं केलं ते बघा. चूका दोनशे झाल्यातरी त्याचं ओझं होऊ देऊ नका.
नव्या वर्षात शिरताना परमेश्वरी चरणी स्वत:ला व चूकांना अर्पण करा. जोपर्यंत तुम्ही स्वत:ला अर्पण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला चूका अर्पण करता येणार नाही.

आपण स्पर्धा खेळूया
अख्खीच्या अख्खी गंगा नदी शिवलिंगावर उपडी करायची आहे कशी कराल? शक्य नाही ना. ते जाऊ दे. सगळ्या आंबांच्या झाडाचे सगळे आंबे एकही आंबा न पाडता अर्पण करायचे आहेत. कसे कराल? टोपलीत गोळा करुन, बरोबर? आणखी एक सांगतो, बागेतील सगळी फुलं एकही फुल न पाडता देवाला अर्पण करायची आहेत कशी कराल? हार, गजरा करुन बरोबर. दोनशे फूलं चिकटवण्यापेक्षा हार, माला बनवून अर्पण करण सोपं असतं.
तसचं जीवनाचं आहे. आमच्या चूका जर देवाच्या चरणी अर्पण करायच्या असतील तर त्या चूका ज्या जीवनसूत्रांनी बांधल्या आहेत ते जीवनसूत्र देवाला अर्पण करायला हवं. तोंडानेही अर्पण म्हणायचं आणि प्रयासही करायचे.


मी काल किती अर्पित होतो, किती आज्ञाधारक होतो हे गुण वाढवत न्यायचे. आपल्या जीवनात जेवढं स्थान आपल्या स्वत:च्या आरामाला असतं म्हणजे २४ तासात १/३ शारिरिक व मानसिक आरामाचं असतं.

जीवन कार्यरत असताना प्राणालाही आराम लागतो, ज्याच्यामुळे आमच्या जीवनाला आराम मिळतो, त्या प्राणांना आराम कोण देणार? मनुष्याचं हृदय दर मिनिटाला ७२ वेळा चालतं जन्मापासून मृत्युपर्यंत. दर मिनिटाला महाप्राण ७२ पावलं चालतो. तुम्ही दिवसभरात ७२ पावलं पण त्याच्यासाठी चालत नाही. तो जन्मल्यापासून मृत्युपर्यंत चालत असतो. आमचा देव आमच्यासाठी काय करतो हे बघायचं असेल तर हे दर मिनिटाला ७२ वेळा पडणारे नाडीचे ठोके बघा.

१,४४० मिनिटं दिवसाच्या २४ तासांत असतात. म्हणजे परमेश्वराचा प्रतिनिधी असणारा तो महाप्राण १,४४० वेळा ७२ पावलं टाकतो आमच्यासाठी. आम्ही एकदा तरी ७२ पावल टाकतो का परमेश्वरासाठी? तरी आम्ही कुठल्या तोंडाने विचारतो मी एवढ्या उपासना केल्या, अध्याय वाचलेत तरी असं का?
एका मिनिटात ७२ पावलं टाकून बघा पण दोन्ही पावलं समान अंतराने पडली पाहिजेत कारण नाडीचे ठोके समानपणे पडतात.
त्यानंतर अशीच दर मिनिटाला ७२ पावलं टाकून एक तास चालून बघा.
आम्हाला स्वत:साठीसुद्धा एवढं चालता येत नाही पण तो महाप्राण प्रत्येकासाठी दर मिनिटाला ७२ वेळा चालतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत अथकपणे. विचार करा जर एक क्षण त्याने विश्रांती घेतली तर? काळजाचा ठोका चुकेल ना?

भक्ती करणं, जप-तप करणं, ग्रंथ वाचणं आवश्यक आहेच. मी हे सगळं करतो म्हणून हे घडलं हा विचार करणं पाप आहे. त्याची कृपा आहे म्हणून सगळं घडतं हा विश्वास आवश्यक आहे.

आम्ही दादांनी सांगितलेले जपजाप केल्यामुळे आमचं काम झालं हा गैरसमज आहे. जेव्हा जग निर्मिती झाली तेव्हा तुम्ही कोणी प्रार्थना केली होती का?
त्याची कर्तुम शक्ती आकलना बाहेरची आहे. दादा आम्हाला जी उपासना देतात ती दादा आम्हाला त्याची कृपा स्विकारण्यासाठी (जी असतेच) समर्थ बनवण्याचा मार्ग दाखवितात.
त्याच्या कृपेचा अनुभव घेतल्यानंतर अतिशय प्रेमाने त्याला I Love You म्हणता यायला पाहिजे. काम होईपर्यंत आम्ही जपजाप regular करतो खरंतर काम झाल्यानंतर जपजाप अधिक वाढले पाहिजे.

लग्नानंतर संसार वाढला पाहिजे, लग्नाआधी मूल होणं चूकीचं आहे. घरात जे जेवण केलयं ते पचवायला पाहिजे. पोटभर जेवल्यावर आडवे होऊन चालत नाही त्यामुळे अपचनाचा त्रास होतो. जेवल्यावर हालचाल होणं आवश्यक आहे. एकदा तृप्ती झाली की शांत राहून चालणार नाही त्यानंतर activity वाढवलीच पाहिजे. तृप्ती नंतर कष्ट, श्रम, परिश्रम अधिक वाढले पाहिजेत.
पण आम्ही देवाने आमची तृप्ती केली की शांत होतो, त्यानंतर अपचन होते, ढेकर येतात. गरज सरो नि वैद्य मरो, नवस पूरा करो आणि देवाला विसरो असं करु नका.

मनुष्य मृत्युला घाबरत नाही तर अज्ञात प्रदेशाला घाबरतो. मनुष्याला मरेपर्यंत मी कसा आहे तेच कळत नाही. मनुष्याने शेवट पर्यंत कधी स्वत:ला ओळखलेलच नसतं. कधी वाटत मी चांगला आहे, तर कधी वाटतं माझ्यासारखा वाईट कोणी नाही. मनुष्य स्वत:ला, आजूबाजूच्या परिस्थितीला ओळखतच नाही. जे यमाला कर भरतात त्यांना यमाची भिती वाटते. दुकानात वस्तूची किंमत देऊन आपण वस्तू विकत घेतो, त्या किंमतीत कर आकारलेला असतो. यम, चित्रगुप्त कर आकारतात. त्यांच्या वर असणारा भगवंत कधीच कर आकारत नाही. आम्ही पिक्चर बघायला तिकिट काढून जातो. पण जो निसर्ग बघायला टॅक्स लागतं नाही तो बघायला आम्ही जातो का? आम्ही सूर्योदय कधी बघतो का? कसलाही कर सूर्य आमच्याकडून आकारत नाही.

गोव्याला आता Sunbath festival होतं. दहा हजार भरुन Sunbath घ्यायचा. आम्हाला फुकट मिळणारी कोवळी सूर्यकिरणं नको असतात, तिकडे दहा हजार भरुन गर्दी करुन sunbath घ्यायला आवडतं.

प्रत्येक गोष्टीची आम्ही किंमत, वजन करत बसतो, पण परमात्मा जे आम्हाला फुकट देतो त्याची आम्हाला किंमत नसते.
दर मिनिटाला हा ७२ पावलं आमच्या देहात चालत असतो अबाधितपणे. आम्ही याला विसरलो तरी तो आम्हाला विसरत नाही. दिवसाला ७२ पावलं चालताना त्याच नामस्मरण करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी ७२ पावलं चाललं पाहिजे.
स्वत:ची सुख किंवा दु:ख वेगवेगळी वाहू नका स्वत:ला वाहा हेच हार करुन अर्पण करण आहे.
प्रसन्नशांती सर्वात महत्त्वाची असते. प्रत्येक मनुष्याला प्रसन्नशांतीच हवी असते. स्मशान शांतता भयावह असते आणि अप्रसन्न शांतता त्रासाची असते. प्रसन्न शांती मिळविण्यासाठी हा व्रताधिराज आहे. प्रपत्ती - पुरुषांची प्रपत्ती श्रावण महिन्याशी जोडलेली आहे आणि स्त्रियांची प्रपत्ती संक्रातीशी जोडलेली आहे.

बापू आमच्याकडून जे काही उपक्रम करवून घेताहेत त्याच्यामागे त्याचा इतकाच हेतू आहे - प्रत्येकाच्या जीवनाची प्रत्येक पहाट प्रसन्नतेने होईल व प्रत्येक रात्र प्रसन्नशांतीत व्हावी.
जीवनाच्या प्रत्येक पावलाबरोबर माझा गुरु माझ्याबरोबर आहेच - हा दृढविश्वास असावा.


एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा

हा ह्या वर्षीचा दृढनिश्र्चय असायला हवा.
श्रीरामचन्द्रप्रित्यर्थे जपे विनियोग: ह्या वर्षी तुम्ही जे काही जपतप, नामस्मरण कराल त्या सगळ्यांचा विनियोग हा निश्चय दृढ होण्यासाठी करा.
मी(बापू) हल्ली १९२० हा पिक्चर पाहिला होता. त्यात जो हिरो असतो त्याला एका दुसर्‍या धर्माच्या मुलीबरोबर प्रेम होतं म्हणून त्याच्या घरातील इतर माणसे त्याचे भाऊ, चुलते वगैरे त्या मुलीला मारायला येतात तो हिरोतीला वाचवतो पण त्याला ह्या सगळ्यामुळे देवाचा राग येतो, आणि तो त्याच्या गळ्यात असणारं हनुमंताचं लॉकेट काढून टाकतो आणि हनुमान चलिसा म्हणायची ही सोडून देतो. त्याच्या दुसर्‍या दिवशीपासून ते भूत बंगल्यात राहायला येतं आणि त्याच्या बायकोच्या शरीराचा ताबा ती प्रेतात्मा घेते, शेवटी जेव्हा तो हनुमान चलिसा म्हणतो तेव्हा ती प्रेतात्मा त्याच्या बायकोच्या शरीराचा ताबा सोडून जाते. आणखी एक स्टोरी त्या पिक्चरमध्ये आहे, जो प्रिस्ट त्या सैतानाला घालविण्यासाठी पवित्र मंत्र म्हणत असतो. त्याला तो सैतान आरशासमोर घेऊन येतो आणि त्याच्या धर्मगुरुने त्याला जे पवित्र स्कार्फ आशीर्वाद म्हणून दिलेलं असतं ते त्याच्या गळ्याभोवतीचं पवित्र स्कार्फ त्याला त्या आरशात सापासारखं दिसतं म्हणून प्रिस्ट ते पवित्र स्कार्फ काढून फेकून देतो आणि सैतान त्याला मारुन टाकतो.

जेव्हा आमच्या मनात विचार येतो की, हे लॉकेट घातलं, जप म्हटला म्हणून वाईट झालं कि समाजयचं सैतानाच काम सुरु झालं आहे, सैतानाने माझा घात करायचा निश्चय केलेला आहे.

ह्या वर्षात हा निश्चय दृढ करायला शिका. तुमचे आप्त असतील त्यांना करायला सांगा. बापूंचा फोटो नको असेल तर दत्तात्रेयांचा, हनुमंताचा, मायचण्डिका ह्यांचं लॉकेट घाला. ह्या निश्चयासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. ह्यावर्षी स्वल्प परिश्रमात हा निश्चय दृढ करु शकता, नंतर करता येईल पण परिश्रम लागतील.

संक्रातीच्या प्रपत्तीला शेवगाच्या शेंगाऐवजी ओले हरभरे जे त्यावेळी उपलब्ध असतात ते वापरले तरी चालतील.
जर आमचा बापू स्वत:चा शब्द न बदलता बदलायला तयार आहे. मग आम्ही ही बदलायला तयार असायला हवं. I am ready to change anywhere.



!! हरि ॐ !!


Sunday, January 9, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०३.११.२०११)

॥ हरी ओम॥
आषाढ पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा ह्या पौर्णिमा वेगळ्या नावाने ओळखल्या जातात. आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा, अश्विन पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखल्या जातात.

ह्या त्रिपुरारीच्या आईचं नाव महिषासूरमर्दिनी आहे, ज्याला तिने मारला त्या नावाने ओळखली जाते त्याप्रमाणे ह्याने त्रिपुरासुराचा नाश केला म्हणून त्रिपुरारी म्हणतात.

साध्या गोष्टीत छान शोधणं, छान बनवणं म्हणजे चिंतन. मूल जेवत का नाही ह्याबद्दल आई विचार करते म्हणजे चिंतन करते. नंतर ती लहान मुलाला कुठले पदार्थ आवडतात ह्याचा शोध घेते आणि मग निरनिराळ्या भाज्या भातांमध्ये, पराठ्यामध्ये घालून मुलाला आवडेल असं खायला बनवते हा तीचा अभ्यास म्हणजे सराव असतो. साड्या घेताना बायका चांगल्या साड्या कुठल्या, कुठल्या साड्या माझ्या मैत्रिणीकडे नाहीयेत ह्याचं चिंतन करतात, नंतर त्या साड्या कुठल्या दुकानात कमीत कमी किंमतीत मिळतात ह्याचा शोध घेतात आणि नंतर ते कितीही लांब असलं तरी त्या ठिकाणी जाऊन साडी घेतात अशा प्रकारे आपल्या आयुष्यात चिंतन, शोध आणि अभ्यास आपोआप चालूच असतो.

आधी चिंतन नंतर शोध नंतर अभ्यास म्हणजे पुरुषार्थ त्यानंतर यश मिळते यशानंतर तृप्ती येते तृप्तीतून शांती मिळते. स्मशान शांती नव्हे समाधानकारक शांती मिळते. आम्हांला यश मिळालं तरी तृप्ती आणि शांती मिळतेच असं नाही. कारण आमच चिंतन, शोध आणि अभ्यास ठरवून केलेला नसतो. नित्य कर्म असो, नैमित्तिक कर्म असो प्रत्येक कर्मात चिंतन, शोध, अभ्यास सुरुच असतो. वाईट माणसांचा मुद्दामहून प्रतिस्पर्धकांबद्दल चिंतन, शोध आणि अभ्यास करत असतात. चिंतन, शोध, अभ्यास ह्या तीन गोष्टी चांगल्या मार्गाने, पवित्र मार्गाने, परमेश्वराचं स्मरण करुन केल्या तर पुढील यश, तृप्ती आणि शांती ही मिळते.

मातृवात्सल्यविन्दानम्‌ मध्ये घडणारी सगळी युद्ध ही शरीरातील नऊच्या नऊ चक्रात चालू असतात आणि प्रत्येक पातळीवर देवीचा, दैवी शक्तीचा म्हणजेच तुमचा विजय होतो आणि तुम्हाला अपयश देणार्‍या गोष्टींचा पराजय होतो. लढणं हा देवी तत्त्वाचा प्रमुख गुणधर्म आहे म्हणून लढाईसाठी लागणारी ताकद मातृवात्सल्यविन्दानम्‌ पासून मिळते. चिंतन, शोध आणि अभ्यास ह्या गोष्टी शिव बाणाने वापराव्या लागतात. शिव म्हणजे पवित्र मार्गाने. त्रिपुरारीला एका रेषेत येऊ न देण्याची जी शक्ती होती तिचा नाश शिवगंगागौरी व किरातरुद्रांनी केला.

त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस प्रत्येक मनुष्याला चिंतन, शोध व अभ्यास ह्याच्यातून जास्तीत जास्त यश, तृप्ती, शांती मिळवून देतो. ह्या दिवशी जो कोणी चांगल बनण्यासाठी चांगला प्रयास, चांगल चिंतन करेल त्यांना मी यश देईन असा परमशिवाचा वर आहे. त्याने वरदान दिलं नाही तरी भक्तांना problem येतो आणि दिलं तरी ही भक्तांनाच problem येतो कारण तो वर इतर कसे वापरतात depend असतं. जे शुभमार्गीय आहेत त्यांचे संकल्प पूर्ण होण्याची शक्ती वाढते, जीवनातलं नैराश्य, अशांती झटकून टाकण्यासाठी ह्या दिवसासारखा दिवस नाही. ह्या दिवशी परमशिव, पार्वती, किरातरुद्र आणि शिवगंगागौरी हे चारही जणं प्रत्येक श्रध्दावानांसाठी चिंतन, शोध आणि अभ्यास त्याचबरोबर यश, तृप्ती आणि शांती ह्यांचा balance करण्यासाठी टपलेले असतात.

मला चांगलं बनायचं आहे असा संकल्प करा, मी जे काही चांगलं करत नाही ते चांगलं करण्यासाठी चांगले संकल्प करा. १०० संकल्प करा ९९ विसरलात तरी एक तरी लक्षात राहील. त्या त्रिपुरारीचं कुठलही नाव घेत घेत आपल्या जीवनाचं चिंतन करा. कमीत कमी त्याच्या नामाचं, त्याच्या गुणांच चिंतन करायला पाहिजे. maximum त्याचं चित्र, त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणता आली पाहिजे.

ह्या दिवशी जो कोणी परमात्मात्रयीचं स्मरण करतो, परमात्म्याचं नाम, भजन, चिंतन सुरु करतो स्वत:साठी केलेलं चिंतन परमात्म्याच्या चिंतनाशी जोडतो त्याला यश मिळतं अशी योजना मोठ्या आईने केलेली आहे. हा दिवस वर्षातून एकदाच येतो.

ह्यावर्षी ह्या दिवशी आपण किरातरुद्राचं पूजन करणार आहोत. ह्या पूजनासाठी किरातरुद्राची सुंदर मूर्ती तयार केली गेली आहे जी पूजनानंतर विसर्जन केली जाईल.

ह्या पूजनासाठी पोस्टकार्ड सारखे तीन पेपर दिले जातील त्यावर ठिपक्यांनी किरातरुद्राची आयुधे काढलेली असतील - शृंगी, धनुष्यबाण आणि त्रिशूल.

प्रथम मंगलाचरण होईल नंतर ही आयुधं हळद व पाणी ह्यांच्या सह्याय्याने कागदावर उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाने (अनामिकाने) चित्र काढायचं ते ताम्हणात आधी शृंगी त्यावर धनुष्य आणि बाण आणि त्यावर त्रिशूलचा कागद ठेवायचा. मग दुसरे स्तोत्र म्हटलं जाईल त्यावेळी सफेद फुलं अर्पण करायची नंतर विशेष नामाचं पठण होईल तेव्हा त्यावर बिल्व पत्र अर्पण करायचं. सगळी स्तोत्रं माझ्या (परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या) आवाजात आहेत. त्यानंतर किरातरुद्राला प्रिय असणारा नैवेद्य अर्पण करायचा आहे. सुक्या खोबर्‍याची वाटी आणि एका पिशवीत यवाचं पीठ असेल. ते अर्पण करायचं.

ते तीन कागद आणि अर्पण केलेला नैवेद्य आपल्याबरोबर घेऊन जायचा. घरी जाताना पूजनाचे १००% व्ह्यायब्रेशन्स्‌ आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून ह्या कागदांबरोबर १०८% व्ह्यायब्रेशन्स्‌ बरोबर घेऊन जाऊ शकतो. हे कागद कमीत एक रात्र आणि जास्तीत जास्त सात दिवस तुमच्या घरी ठेवू शकता त्यानंतर ते कागद पाण्यात विसर्जन करावेत किंवा तुळस, केळी किंवा औदुंबराच्या झाडाखालील मातीत पुरावेत म्हणजेच भूमातेला अर्पण करावेत. घरातील कोणी व्यक्तीने किंवा मित्रमंडळींमधील कोणी पूजन केलेले नसेल तर ज्या व्यक्तीने हे पूजन केले आहे त्या व्यक्तीने ते कागद त्यांच्या मस्तकाला लावावेत त्यामुळे त्यांनाही पूजनाचे व्हायब्रेशन्स्‌ मिळू शकतील.

खोबरे जेवणात वापरावं व्हेज-नॉनव्हेज कशातही वापरा मला (परमपूज्य बापूंना) फरक पडत नाही. यवाच्या पिठात दूध व पिठी साखर मिक्स करुन ते प्रसाद म्हणून द्यावा.

त्यानंतर मार्गशिर्ष महिन्यात गुरुक्षेत्रम्‌मध्ये किरातरुद्र आणि शिवगंगागौरी ह्यांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यावेळी आपल्या गुरुक्षेत्रम्‌च्या उदीमध्ये जी गोविद्यापिठम्‌ मध्ये तयार होते त्या उदीत मी (परमपूज्य अनिरुद्ध बापू) करत असलेल्या यज्ञाचे भस्म मिक्स केले जाते. त्यातच आता परशूरामाला किरातरुद्राकडून मिळालेले भस्म मिसळण्यात येणार आहे. हे भस्म म्हणजे माझी (परमपूज्य बापूंची) रेणूका माता सती गेली त्यावेळी तिच्या चितेचे भस्म जे दत्तात्रेयांनी किरातरुद्राकडून परशूरामाला दिले होते ते आहे. त्याच बरोबर उदीच्या बाजूला एका पात्रात हळद ठेवली जाईल ही हळद म्हणजे रेणूका माती सती जाताना तिच्या मळवटातील तीने जी हळद काढून दिली होती ती परशूरामाला शिवगंगागौरी कडून मिळाली होती ती हळद गुरुक्षेत्रम्‌मध्ये ठेवण्यात येईल आणि ती पूर्णपणे विनामूल्य असेल. ह्या मी (परमपूज्य बापू) माझ्या गोष्टी तुम्हाला देतोय ह्या विकून दिल्या जात नाहीत. मी (परमपूज्य बापू) माझ्या आईबापाला विकू शकत नाही.

ही हळद घरातील कुठल्याही मंगलकार्याला, पूजनाला वापरु शकता, हळदी-कुंकवाच्या समारंभासाठी वापरु शकता, शत्रू घरी आला तरी शत्रुला लावू शकता (पुरुषांनाही हळद लावतात), लग्नकार्यातील हळदी समारंभात वापरु शकता, कोणी तुमच्यावर ब्लॅक मॅजिक केलेलं असेलं आणि तुम्ही ही हळद लावलेली असेल तर ते ब्लॅक मॅजिक ज्याने केलेयं त्याच्यावरच उलटेल. अशी ही हळद आणि हे भस्म ह्या जन्मात आम्हाला प्राप्त झालयं मग ह्याचा पूर्ण उपयोग करुन घ्या.

त्रिपुरारी पौर्णिमा १० तारखेला असली तरी आपण ती १२ तारखेला साजरी करणार आहोत म्हणून आपल्यासाठी अनिरुद्ध पौर्णिमा १२ तारीखच चंद्राचं चंद्र बघून घेईल मी (परमपूज्य बापू) सांगितलेल्या तारखेला आपली अनिरुद्ध पौर्णिमा असेल. त्यामुळे आता पासूनच उत्सवाला तयारी करा.

॥ हरि ॐ॥